आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Friday 8 July 2016

YCMOU ALL RESULT कसे पहावे

Yashwantrao Chavan Maharashtra Open University

All Results  Click Here


यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा Click Here
आपन (Click Here)या बटनावर क्लिक करा आपल्या समोर यशवंतराव चव्हाण मुक्त़ विद्यापिठचा पेज ओपन   होईल खालीदिलेल्या तक्त्यात आपल्याला कोणता निकाल पाहवयाचा असेल तर Click Here  हे बटन दाबुन आपल्यासमोर समोर Student Result हे पेज ओपन होईल आपल्याला कोणत्या वर्षाचा निकाल पाहयचा असेल तर Exam Event समोरील बोक्स़ मध्ये क्लिक करा आणि आपल्याला हवे ते वर्ष टाका समोरच PRN असा बॉक्स़ दिसेल त्यामध्ये आपल्याला मिळालेला PRN टाका आणि सर्च 


(Search) या बटनावर क्लिक करा आपल्याला आपला Result दिसेल आपण त्या Result प्रिंट सुध्दा काढु शकतो प्रिंट या बटनावर क्लिक करा आणि आपल्या प्रिंट मिळेल असा आहे आपला Result .

Thursday 7 July 2016

लग्न म्हणजे काय (What is marriage )


लग्न म्हणजे काय
What is marriage



लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही वेंधळा असला तरी
त्याला सांभाळून घ्यायचं असतं
तिने कसाही स्वयंपाक केला तरी
त्याला मस्त म्हणायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं?
क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी
त्याच्यासाठी ते enjoy करायचं असतं
तुळशीबागेत जायचा कंटाळा आला असला तरी
तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही म्हातारा झाला तरी
त्याला चिरतरूण भासवायचं असतं
मी जाड झालेय का? या वाक्याला
कधीही हो म्हणायचं नसतं
लग्न म्हणजे काय असतं?
दोन्ही घरच्या नात्यांना 
आपुलकीने जपायचं असतं
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना 
हसत हसत विसरायचं असतं
थोडक्यात काय?
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये
केलेलं compromise असतं
कारण we will grow old together
असं एकमेकाला केलेलं promise असतं...
आय लव यू प्रिंसेस

Monday 4 July 2016

Mother & Father ~आई बाबा

आई बाबा

आम्ही फक्त आमच्या गर्मीत असतो
आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची
कारण भाकर खातो कष्टाची अन्
सेवा करतो आई बापाची……

Tuesday 28 June 2016

Zade Lava Zade Jagva (झाडे लावा झाडे जगवा)

वृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणायचे  

जेव्हा मानवाने ह्या जमिनीवर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासूनच निवाऱ्याकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली. विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे.

वृक्षतोडीमुळे जल, स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेच, मात्र पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत ‘पाऊस’ असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा, डोळ्यांचे विकार, श्वसनाचे आजार, हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते 

जगण्यासाठी जग लागतं
झाडे लावा !!, झाडे वाचवा!! , झाडे जगवा आणि पृथ्वीला वाचवा !!!!

तरच तुम्ही वाचाल.                                 
------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------



जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा