आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Friday 24 June 2016

विश्वास नांगरे पाटील म्हणतात (vishwas nangare patil)


विश्वास नांगरे पाटील म्हणतात,


परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , *"मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ."*

चहा कडवट लागला . नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई *कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे .* काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार. 
सैराट करमणूक म्हणून पहा पण *आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .*
योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .


केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत

1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले. 


आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!


जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा